खानावडीतील कामगारांवर मधमाशांचा हल्ला…! जिल्हा परिषदेतील घटना

गोंदिया :– जिल्हा परिषदेत सध्या क्रीडा सत्र सुरू आहे. शेवटच्या दिवशी (दि. 27 फेब्रुवारी) रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्त खानावडीसाठी काम करणाऱ्या कामगारांना मधमाशांनी चावा घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामध्ये केटरिंग साठी काम करणाऱ्या महिला तसेच सजावटीचे काम करणाऱ्या अनेक पुरुषांचा समावेश होता. या बाबीची दखल घेत प्रशासनाने तातडीने लक्ष देत जिल्हा परिषदेतील स्थानिक डॉक्टरांनी जखमींना वेळीच औषध उपचार करून त्यांच्या बचाव केला. या घटनेमुळे चालत असलेल्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment